पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘महिला व बाल कल्याण समिती‘ सदस्यपदी नगरसेविका निकिता ताई कदम यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, राजमुद्रा फाऊंडेशनसह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.निकिता ताई कदम यांचा जनसंपर्क आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याची त्यांची पद्धत लक्षात घेता, पक्षाने आणि प्रशासनाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या समितीच्या माध्यमातून आता शहरातील महिलांचे सक्षमीकरण, बाल आरोग्य आणि अंगणवाड्यांचे सक्षमीकरण या विषयांना अधिक गती मिळणार आहे.
‘राजमुद्रा फाऊंडेशन’कडून विशेष गौरव:या निवडीबद्दल राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने निकिता ताईंचे विशेष अभिनंदन करण्यात आले. “निकिता ताईंचे नेतृत्व नेहमीच सर्वसामान्यांच्या हितासाठी राहिले आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्या शहराच्या विकासात आपले मोलाचे योगदान देतील,” असा विश्वास फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार – निकिता ताई कदमआपल्या निवडीनंतर बोलताना निकिता ताई कदम म्हणाल्या की, “माझ्यावर जो विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. शहरातील महिला भगिनींच्या समस्या सोडवणे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवणे, हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.
“या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


